Aditya29593
- Reads 27,970
- Votes 81
- Parts 6
नमस्कार ही कहाणी लेखिका--सौ आदिती यांनी लिहिली आहे. मला खूप आवडली म्हणून मी तुमच्या बरोबर ष शेअर करतोय .
एका परगावात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या कुटुंबाची..एक मध्यमवर्गीय कुटुंब..नुकताच लग्न झालेला उत्तम अन त्याच वर्षी त्याला शिक्षकाची नोकरी देखील लागली होती..परंतु नोकरी खुप दूर असलेल्या गावी होती..उत्तम आपल्या पत्नीला म्हणजेच गीतांजली ला म्हणाला, गीतू तू माझ्या आयुष्यात आलीस अन मला लॉटरी च लागली.आपलं लग्न काय झालं अन मला नोकरी सुद्धा लागली..तशी गीतांजली म्हणाली, अहो ही तर तुमची मेहनत मी आपली निमित्तमात्र..उत्तम नवीनच लग्न झाल्याने आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करत