AnandPranay
- Membaca 3,253
- Vote 12
- Bab 5
सोनाली आज दोन वर्षानंतर माहेरी निघाली होती. तिच्या साध्यासुध्या नवऱ्याने मुंबईहुन तिच्या गावचे तिकीट आधीच काढून ठेवल्याने ती खुश तर होती पण दोन वर्षानंतरही मुलं न झाल्याने माहेरी काय उत्तर द्यायच ह्याचा विचारही तिला भेडसावत होता. सकाळी तिच्या नवऱ्याने तिला ट्रेन मध्ये बसवून दिले. गाडी मध्ये तिच्या भरलेल्या मदमस्त ज्वानीला टुकनाऱ्या नजरांना प्रतिसाद देत ती दहा तासात आपल्या गावाला पोचली.
ती ट्रेन मधून उतरून रिक्षाने ती आपल्या घराकडे निघाली दोन वर्षात गावाचे रंगरुपच पालटले होते. वाटेत दुतर्फा वाढलेले मळे, शेत बघून तिच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळतं होता. तोच मळ्याच्या दुरवर असलेले घनदाट आंब्याचे झाड बघून तिला गोड शहारे आले...'वस्या'.