तुझ्या बद्दलच्या भावना लिहीताना
शब्दानां शब्द जुळत नव्हता,
क्षणा-क्षणाला वाढणारा तो भाव
माझा मलाच कळत नव्हता.
तुला जाणून घेण्याची ओढ नव्हती
ना तु कसा असशील याची भिती,
तु किती कमवतो? तुला व्यसन कुठलं??
ही माहिती ही नकोच होती.
तु बोलत होतास,मी ऐकत होते आणि
तिथेच माझे असे काही हरवत होते.
तुझ्या गालावरची खळी, चष्म्याआडून दिसणारे
बोलके डोळे ,अधून मधून मी ही न्याहळत होते.
तुला भेटायची ओढ तर होतीच उरी
पण एक वेगळीच भिती मनात खेळत होती ,
तुझ्या ही मनात असच काही चालत असावं
कळत होतं जेव्हा नजरेस नजर आपली मिळत होती.
मला पाहिल्यावर तु काय म्हणशील? हसशील की
ती ही नव्हेच असे भाव चेहयावर उमटतील?
असे अनेक प्रश्न येत होते मनात, पण सगळंच वाहून गेलं
अलगदपणे, आपल्या भेटीच्या त्या पहिल्या क्षणात ..
आपल्या भेटीच्या त्या पहिल्या क्षणात.......

YOU ARE READING
मराठी कवीता
Poetryप्रेम, विरह, निसर्ग, पाऊस, समाज,काही न विचार केलेल्या गोष्टी या सगळ्यांना कवितेच्या रुपात मांडण्याचा एक निरागस प्रयत्न...